Saturday, 19 April 2025

शिक्षकांना कोणत्या गोष्टीचे स्वातंत्र्य हवे आणि का?

 शिक्षकांना कोणत्या गोष्टीचे स्वातंत्र्य हवे आणि का?

शिक्षणाचे पाईक आम्ही गुणवत्ता आमचा ध्यास। 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धरतो आम्ही प्रयत्नांची कास ॥

होय, आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. आनंददायी शिक्षणाची पणती हाती घेऊन या कोवळ्या विद्यार्थ्यांच्या मनातील ज्ञानज्योती पेटवणारे आम्ही शिक्षक. सद्यपरिस्थितीत शिक्षकांच्या बाबतीत ही बिरुदावली आपणास योग्य वाटते का ? विचार करून उत्तर दिल्यास... नाहीच! अशैक्षणिक कामांच्या प्रचंड ओझ्याखाली अतिशय दबावाने काम करणारा आजचा शिक्षक 'पारतंत्र्यात 'असून तो स्वतंत्र होऊन विद्यार्थ्यांच्या मनातील ज्ञानज्योत कधी पेटवणार ? याचे उत्तर सध्या आमच्याकडेही नाही. ज्या शिक्षणपद्धतीत शिक्षकास स्वातंत्र्य नाही, त्याचा विचार समाजातील विविध घटक करत असतात. ते शिक्षणपद्धतीस हसून नावे ठेवतील, परिवर्तनाची वाट पाहतील. 'गुणवत्ता' हा शब्द फक्त कागदावर न राहता विद्यार्थ्यांमध्ये पूर्णत्वास येण्यासाठी खरंच आम्हा शिक्षकांना 'स्वातंत्र्य' हवे आहे. फक्त आणि फक्त विद्यार्थी हितासाठी त्यांचे भविष्य घडविण्यासाठी आम्हांला पुढील काही गोष्टींचे स्वातंत्र्य हवे आहे....

१. सृजनशील कार्य-स्वातंत्र्य

प्रत्येक शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी सृजनशील काम करीत असतो. लहान लहान वर्गकार्यातून त्याची सृजनशीलता दिसून येते, मात्र वर्गपातळीवरून शाळा, समाजापर्यंत जाऊन कार्य करण्याची त्याची क्षमता असते. शालेय प्रशासन त्याला कार्य करण्याचे स्वातंत्र्य देत नाही, त्यामुळे त्याची सृजनशीलता वर्गापुरती मर्यादित राहून त्याला आळा बसतो. 'स्व' पातळीवरून समाज, प्रशासनापर्यंत तो पोहचू शकत नाही.

२. विचारांचे स्वातंत्र्य

आपले अनुभव, आपल्या ज्ञानाच्या जोरावर शिक्षक विद्यार्थ्यांना नवनवीन अनुभव देत असतो. वर्गाच्या चार भिंतीतच हे अनुभव विद्यार्थ्यांना मिळतात. आजच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या शैलीत स्वातंत्र्य नाही. कारण शिक्षकांकडे 'विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून' बाकीची कामे करण्यासाठी वेळच नाही. या तणावामुळे वैचारिक स्वातंत्र्यावर बंधने येतात. वैचारिक स्वातंत्र्यावर सारखी बंधने येत राहिल्यास त्यांच्या नवनिर्मितीला प्रोत्साहन न मिळता उदासीनता येते, म्हणून शिक्षकांस वैचारिक स्वातंत्र्य हवे.


३. शैक्षणिक स्वातंत्र्य

शिक्षणात वर्गातील वेळापत्रकापासून अभ्यासक्रम, अध्यापन साहित्य, तंत्रज्ञान उपयोगी, साधने, प्रगतीपुस्तकातील गुणवत्तेपासून प्रत्यक्ष वर्गातील गुणवत्ता साध्य होईपर्यंत सर्व शैक्षणिक कामे शिक्षकांनाच करावी लागतात. शिकवण्याच्या अध्यापन पद्धतीपासून वरील सर्व कामे करण्याचे शैक्षणिक स्वातंत्र्य शिक्षकांना मिळायला हवे, कारण ... 

शाळा माझी, मी शाळेचा 

प्रत्येक क्षण माझा, माझ्या विद्यार्थ्यांचा 

विचार करूनी शिक्षणातील स्वातंत्र्याचा 

उत्तुंग कळस चढविणार मी ज्ञानाचा......

४. व्यक्तिगत विकासाचे स्वातंत्र्य

शिक्षकांना त्यांच्याकडील कौशल्य व ज्ञान अद्ययावत करण्याचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक स्वातंत्र्य हवे. शिक्षकांना आजच्या शिक्षणपद्धतीत सातत्याने 'अद्ययावत' राहून स्वतः सह विद्यार्थ्यांचा विकास करायचा असतो. शिक्षकांनी स्वतःची वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती साधल्यास नवनवीन शिक्षणपद्धती अंमलात आणता येतील. त्याचा उपयोग एका वर्गापूरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातल्या शाळेतील सर्व मुलांना होईल.

५. प्रशासनिक स्वातंत्र्य 

काही वेळा शाळा किंवा शिक्षणसंस्थामधील (मग ते खाजगी असो वा सरकारी) अवास्तव / अमर्याद असा प्रशासनिक दबाव शिक्षकांवर पडत असतो. त्याची कारणे वैयक्तिक असतील वा सामूहिक. त्यामुळे शिक्षक, संस्था, प्रशासन यांमधील दरी वाढत जाते. वितुष्ट निर्माण होते. या गोष्टीचा परिणाम कधीकधी पूर्ण शाळेला भोगावा लागतो. त्यामुळे दबावाशिवाय मनापासून शिकविण्याचे प्रशासनिक स्वातंत्र्य शिक्षकांना मिळायला हवे. 

६. अशैक्षणिक कामांपासून स्वातंत्र्य 

अलीकडचीच ताजी घटना म्हणजे अशैक्षणिक कार्यांपासून मुक्तता मिळावी यासाठी १ ते १.५ लाख शिक्षकांचे राज्यव्यापी आंदोलन, मोर्चा..... हे सर्व पाहिल्यास वाटते की, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये इतकी त्रेधातिरपीट चालू आहे की, 'आम्हांला आमचे काम करू घा' हे आंदोलन करून सांगावे लागते, तेही चांगल्या, योग्य कारणासाठी. प्रशासनाच्या पारतंत्र्यात अडकलेला आजचा शिक्षक. तो कधी कारकून होतो, मतदान अधिकारी होतो, सफाई कर्मचारी तर कधी शिपाई. वेळ मिळाल्यास 'शिक्षक' बनतो. अशा या द्विधा मनस्थितीत त्याच्या हातून साक्षर, सुसंस्कृत आजची पिढी कशी घडणार ? याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे. एक, दोन नाही तर तब्बल दीडशे अशैक्षणिक कामांची यादी शिक्षकांच्या व्यथांमुळे तयार झाली आहे.

'शिकवणे' ही मूळ जबाबदारी सोडून बाकीची सर्व अशैक्षणिक काम केल्यास तुमचा 'पगार' चालू राहील. नाहीतर सर्व 'अनुदान रद्द !' असे आदेश धडकतात. मूळ शिक्षणाच्या जबाबदाऱ्या कमी होऊन शिक्षणातील रस या अशैक्षणिक कामांमुळे कमी होतो. म्हणून या कामांपासून कायमचे स्वातंत्र्य हवे.

अशैक्षणिक कामांचे ओझे

अशैक्षणिक कामांपासून मुक्ती न मिळाल्यास शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर ताण येऊन त्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर होतो.

सृजनशीलतेमध्ये निरसता येऊन व्यवसायिक विकासात अडथळे निर्माण होतात. एकंदरीत कार्यक्षमतेत घट होऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि समस्त समाजावर त्यांचे वाईट परिणाम होतात.

सांगायचे तात्पर्य म्हणजे शिक्षक हा समाजातील जबाबदार घटक म्हणून काम करत असताना त्याने 'मूलांत मूल होऊन शिकवले पाहिजे' हे वाक्य वाचून खरंच सद्यपरिस्थितीत वाईट वाटते. त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, समजून घेणे, त्यांच्यावरील ताण कमी करणे असे प्रशासनाला का वाटत नाही ? वाटत नसेल तर शिक्षकांनी संभाव्य चांगल्या बदलासाठी असहकार करणे, आंदोलन करणे यांतून विद्यार्थी, समाज काय बोध घेतील ? हे योग्य आहे का ? शिक्षण चांगले मिळण्यासाठी शिक्षणपद्धतीत सामंजस्यासारखे मार्ग निघत नसतील तर अशा शिक्षणाचा काय उपयोग ?

'अर्थपूर्ण स्वातंत्र्य'लाभलेला गुणी शिक्षक 

संस्कारांनी घडविती उद्याचा बालक 

उत्साही, निर्भय बनवूनी लावितो लळा 

सृजनशीलतेने फुलवितो बालमळा.....

सुसंस्कृत असा बालमळा फुलविण्याचे 'पुण्य कार्य घडविण्यासाठी शिक्षक हा परिपूर्ण शैक्षणिक दृष्टीकोनाने स्वतंत्र असावा. विचारस्वातंत्र्याने पारंपारिक शिक्षणपद्धती ओलांडून प्रभावी शिक्षण 'शिक्षकच' देऊ शकतो. मानसिकदृष्ट्या सक्षम शिक्षक प्रगल्भ दृष्टीकोनातून विचार करीत समस्या सोडवितो, विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो, त्यांचा बौद्धिक विकास साधतो. विचारस्वातंत्र्य हे शिक्षकांना कोणत्याही राजकीय दबावाशिवाय शिकविण्याची मुभा देतो. उदा. वारे गुरुजींची वाबळेवाडी ही पहिली शाळा. कित्येक समस्यांना तोंड देत वारे गुरुजींनी आपली दुसरी शाळाही तेवढीच दर्जेदार बनविली आहे. त्यामुळे त्यांचे विचार 'MOLI'अध्ययन प्रशिक्षणांतून सर्वांपर्यंत पोहचले आहेत. या प्रेरणेतून शिक्षक स्वतःचे ज्ञान, अनुभव वाढवून शिक्षणपद्धतीचा कायापालट करण्यास उत्सुक आहेत, तर काही ठिकाणी काही शिक्षक निरुत्साही आहेत. असे शिक्षक स्वतः काही करत नाहीत, स्वातंत्र्यावर बोलतही नाहीत. "आमचं जे चाललयं ते बरं आहे, तुम्ही काय नवीन करायचे ते करा, आम्हांला काही सांगू नका," असेही काहीजण बोलतात.

विचारस्वातंत्र्य नसेल तर अपेक्षित अशा समाजहितासाठी, प्रगतीसाठी योगदान देणारे, व्यापक दृष्टीकोन असणारे, समोर असलेल्या आव्हानांवर विचार करणारे शिक्षक कसे तयार होतील ? त्यांचे विद्यार्थी कसे तयार होतील ? भारतातील सक्षम नागरिक पिढी कशी तयार होईल ? यावरही चिंतन करावे लागेल ? म्हणूनच आजच्या पिढीला 'स्वतंत्र विचाराने, नवकल्पना अंमलात आणून सुधारणा घडविणारा शिक्षक हवा आहे. तंत्रज्ञानामध्ये Techno addict' न होता 'Techno-savvy 'विद्यार्थी घडविणारा 'स्मार्ट' शिक्षक हवा आहे.

सध्याचे शिक्षण हे बालकेंद्रित शिक्षण असून ज्ञानरचनावादावर आधारित आहे, तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षक आपली अध्यापन पद्धती बदलू शकतात. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणारे सक्षम विद्यार्थी आपल्याला तयार करायचे आहेत. शिक्षकांच्या कल्पकतेला चालना देऊन त्यांना संसाधने पुरविणे, प्रशिक्षण देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांना कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, जेणेकरून अपेक्षित वर्तनबदल घडवू शकतील, याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे.

शिक्षकाने 'मुलांना स्वतंत्रपणे विचार करून स्वतः शिकण्यास प्रवृत्त करणे, प्रोत्साहन देणे' गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षक हा 'प्रामाणिक' - स्वातंत्र्याने काम करणारा असावा. अशाप्रकारचे शिक्षण आणि शिक्षक एकत्र आले तर विद्यार्थ्यांना जीवनातील खरे ज्ञान मिळू शकते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्याला जगाच्या व्यासपीठावर स्थान मिळवून दयायचे स्वप्न हे सध्याच्या आणि भविष्यातल्या शिक्षकांचे स्वप्न असावे. त्यासाठी ज्ञानदान करण्यासाठी तो स्वतंत्र असला पाहिजे, हो ना ? शेवटी एवढीच शिक्षक अपेक्षा व्यक्त करते की,

ज्ञानदानाचे कार्य करण्या 

तत्पर सर्वदा स्वतंत्र' असेन मी... 

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास 

स्वप्न हेच पाहीन मी.. पाहीन मी ।

धन्यवाद !

-नर्मदा नरेश कनकी

(शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2024 मराठी माध्यमातील प्रथम क्रमांक प्राप्त निबंध)

Saturday, 12 April 2025

अशैक्षणिक कामे नसतील तर शिक्षक म्हणून आत्तापेक्षा अधिक मी काय-काय करू शकेन?

 अशैक्षणिक कामे नसतील तर शिक्षक म्हणून आत्तापेक्षा अधिक मी काय-काय करू शकेन?

 'कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरून घालितो धपाटा आत आधाराचा हात'

'गुरू' या कवितेतील ओळीप्रमाणे प्रत्येक गुरू त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक मुलाला घडवत असतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रत्येक पैलू अभ्यासातून त्याचा विकास करण्यासाठी अविरत कार्य करत असतो; परंतु हे सध्या दुरापास्त होत चालले आहे. याचे कारण म्हणजे शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे.

'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन सर नुसते लढ म्हणा' या ज्येष्ठ कवी कुसुमाग्रजांच्या 'कणा' या सुप्रसिद्ध कवितेच्या शेवटच्या ओळी, या ओळीत विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर असलेला विश्वास, आदर दिसून येतो. सध्याचा शिक्षक मात्र या बाबींसाठी पारखा झालाय. कारण शिक्षक वि‌द्यार्थ्यांसमोर खूप कमी वेळ उपस्थित आहे, आणि तो जास्तीत जास्त वेळ अशैक्षणिक कामात व्यस्त आहे. काही सर्वेक्षकांच्या मते तर शिक्षकाचे आठवड्याचे अध्यापनाचे तास जवळपास १० ते १५ टक्केच होतात, परिणामी मुलांना खाजगी शिकवणी लावली जाते. हे आणि असे कितीतरी अनर्थ या अशैक्षणिक कामाच्या अतिरेकामुळे झाले आहेत. 'अति तेथे माती' या म्हणीचा प्रत्यय सध्या ग्रामीण भागातील शिक्षकांना येतोय.

'विद्या ददाति विनयं' या संस्कृत उक्तीप्रमाणे शिक्षणातून विनम्रता आणि शिस्त निर्माण होते. शिक्षक हा समाजाच्या विकासाचा आधारस्तंभ आहे. केवळ पाठ्यपुस्तकाचे शिक्षण देणारा नव्हे, तर वि‌द्यार्थी घडवणारा, समाजाला दिशा देणारा शिक्षक हा दीपस्तंभ असतो; परंतु अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांवर भार येतो आणि त्याची मूळ जबाबदारी दूर जाते. अशा कामांपासून शिक्षकांना जर मुक्ती मिळाली तर विद्यार्थ्यांसाठी ते आणखी काय करू शकतात, यावर विचार मांडणे महत्त्वाचे आहे.

विद्यार्थी घडवण्यासाठी अधिक वेळ

हिंदीमध्ये एक सुवचन आहे, 'शिक्षक वह है जो अंधकार में दीप जलाता है'. जर अशैक्षणिक कामाची जबाबदारी कमी झाली तर मला विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्याची संधी मिळेल. मी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि शैक्षणिक विकासाकडे अधिक लक्ष देवू शकेन. "The best teachers teach from the heart not from the book." याप्रमाणे मी फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यातील आत्मविश्वास, शिस्त आणि सामाजिक मूल्यांचे शिक्षण देवू शकेन. प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकेन.

पालक आणि शिक्षक यांच्यातील परस्पर सहकार्य

 'मुलांचे पहिले शिक्षक हे त्यांचे आई-वडील असतात. पालक मुलांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. अशैक्षणिक कामांतून मोकळीक मिळाल्यास मी पालकांशी सुसंवाद साधून मुलांच्या शैक्षणिक विकासात अधिक सक्रिय सहभाग घ्यायला सांगू शकतो. पालक आणि शिक्षक यांच्यातील परस्पर सहकार्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष कार्यक्रम, कार्यशाळा करू आयोजित करून पालक -शिक्षक संबंध अधिक मजबूत करू शकतो, ज्यायोगे शिक्षकाचा समाजातील मान-सन्मान वृद्धिंगत होईल.

नवोन्मेषी अध्यापन पद्‌धतींचा अवलंब

'ज्ञानस्य प्रधान साधनं विज्ञान' या संस्कृत वचनाप्रमाणे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. आज मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. अशैक्षणिक कामातून मोकळा झाल्यास मी वि‌द्यार्थ्यांना ई-लर्निंग स्मार्ट क्लासेस आणि इंटरनेट-लर्निगच्या विविध साधनांचा उपयोग करून शिकवू शकेन. "A teacher affects eternity; he can never tell where his influence stops" या इंग्रजी उक्तीप्रमाणे नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून वि‌द्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीची ओळख करून देवून तंत्रज्ञानाधारीत शिक्षणाने वि‌द्यार्थ्यांचे ज्ञान अधिक सखोल बनवू शकेन. 

संशोधन आणि नवोन्मेष

'ज्ञान ही शक्ती आहे.' या सुवचनाप्रमाणे मी शिक्षण क्षेत्रात नवीन संशोधन आणि नवोन्मेषी प्रकल्प राबवू शकतो. अशैक्षणिक कामामुळे याकडे दुर्लक्ष होते; परंतु अशैक्षणिक कामांतून मुक्तता मिळाल्यास मी शैक्षणिक तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांवर अधिक संशोधन करून नवीन अध्यापन प‌द्धती, वि‌द्यार्थ्यांचे मानसशास्त्र समजून घेऊन, मी त्यांना अधिक चांगल्या प्रकारे कसे शिकवता येईल यावर काम करु शकेन. ज्यामुळे वि‌द्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल आणि शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल.

शालेय अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन आणि सुधारणा

'विद्या विनियोगात विस्तारः' या संस्कृत सुभाषितानूसार शिक्षणाचा उ‌द्देश अधिक ज्ञानाचा प्रसार करणे हा असतो. शिक्षक म्हणून मी अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेन. आधुनिक जगाच्या गरजानुसार वि‌द्यार्थ्यांना घडवण्यासाठी मी शिक्षण प‌द्धतीमध्ये सुधारणा सुचवू शकतो. यासाठी जागतिक स्तरावर चालणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचा अभ्यास करून, शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात मदत करू शकतोः एकविसाव्या शतकातील विविध आव्हाने पेलण्यासाठी सक्षम वि‌द्यार्थी बनवण्यासाठी विविध कृती पाठ्यक्रमात सुचवू शकतो. तसेच जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल, नवनवीन संशोधनाचा विचार करता नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सक्षम करणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून अभ्यासक्रम निर्मितीमध्ये योगदान देऊ शकेन.

विद्यार्थी कौशल्य विकास

शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी जागा नसून वि‌द्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवणारी प्रयोगशाळा असली पाहिजे. "शिक्षा वह है जो जीवन के लिए तैयार करती है" यानुसार भी वि‌द्यार्थ्यांना जीवन कौशल्याचे शिक्षण देऊ शकेन. नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निर्णयक्षमता यांसारख्या जीवन-कौशल्यांच्या विकासासाठी मी सहविचार सत्रे आणि कार्यशाळा आयोजित करू शकेन. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० नुसार मुलांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये (6Cs) Critical thinking, Creative thinking, Collaboration, Communication, Confidence, Compassion विकसित करण्याच्या दृष्टीने योग्य प्रकारे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन करू शकेन.

क्रीडा आणि सांस्कृतिक विकासात मार्गदर्शन

 'स्वस्थ शरीर में स्वस्थ मन वास करता है।' याचा अर्थ शारीरिक आणि मानसिक आरोग्य विदयार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. अशैक्षणिक कामातून मुक्त झाल्यास मी वि‌द्यार्थ्यांना क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अधिक मार्गदर्शन करू शकेन. 'शरीर माध्यम् खलुं सर्व साधनम्' या संस्कृत सुवचनानुसार सक्षम शरीर सर्व प्रकारच्या बाबींसाठी तयार असते. म्हणतात ना 'निरोगी शरीरात निरोगी मन वास करते'. यासाठी विविध समाजघटक, तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून घेऊन वि‌द्यार्थ्यांचा क्रीडा व सांस्कृतिक विकास साध्य करू शकेन व भावी पिढी निरोगी आणि सुसंकृत बनवण्यात योगदान देऊ शकेन.

वि‌द्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी मदत

अशैक्षणिक कामामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार केला जातच माही. याचा परिणाम वि‌द्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासावर झाल्याचे दिसून येते. विद्यार्थी अधिक आक्रमक, सहानुभूतीशून्य असे वागू लागले आहेत. याचा परिणाम समाजजीवनावर होत आहे. आधुनिक काळात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देणे खूप महत्त्वाचे झाले आहे. 'मन के हारे हार है, मन के जीते जीत' यानुसार विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य त्याच्या जीवनातील यशस्वीतेत मोठी भूमिका बजावते. अशैक्षणिक कामातून मोकळीक मिळाल्यास, मी वि‌द्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या सुधारणेसाठी विशेष सत्रे आयोजित करून तज्ज्ञांच्या मदतीने मानसिक ताण-तणावावर उपाय शोधण्यासाठी मार्गदर्शन करू शकेन.

सामुदायिक संवाद आणि नेतृत्व

'शिक्षक समाज का मार्गदर्शक होता है' यानुसार सांगायचे झाल्यास समाजात घडणाऱ्या समस्यांवर शिक्षक सकारात्मक दृष्टिकोनातून उपाय शोधू शकतो, संवाद साधू शकतो. पर्यावरण संवर्धन, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करु शकतो. शिक्षक म्हणून मी समाजातील विविध उपक्रमात सहभागी होऊन समाजाच्या उन्नतीसाठी काम करू शकेन. 'Unity is strength' नुसार समाजाला एकत्र आणून सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मी विशेष चर्चासत्रे आयोजित करू शकेन. शिक्षणविषयक योजनांमध्ये सहभाग घेतल्यास, मी समाजातील शिक्षणाची पातळी उंचावण्यासाठी मदत करु शकेन. विद्यार्थ्यांना सामुदायिक समस्यांवर जागरूक करून त्यांना समाजसुधारक म्हणून घडवण्यासाठी कार्य करू शकेन.

शिक्षकाच्या कर्तव्यामध्ये अशैक्षणिक कामे अडथळा ठरतात, परंतु त्यापासून मुक्ती मिळाल्यास शिक्षक आपल्या वि‌द्यार्थ्यांना आणि समाजाला अधिक परिणामकारकपणे घडवू शकतो.

गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः गुरु: साक्षात् पर ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः

यानुसार गुरुचे स्थान, दर्जा खूप उच्च आहे. गुरु हा ईश्वरासमान मानला आहे कारण तो जीवनाचा दीपस्तंभ आहे.

समाजाला घडवण्यासाठी शिक्षकाला वेळ आणि स्वातंत्र्य दिल्यास तो समाजाच्या विकासासाठी अनमोल योगदान देवू शकतो.

"A good teacher can inspire hope, ignite the imagination and instill a love of learning!" याप्रमाणे शिक्षकाचे कार्य समाजात आदर्श परिवर्तन घडवण्यासाठी अनिवार्य आहे.

यासाठी तो अशैक्षणिक कामातून मुक्त असायला हवा. अशा शिक्षकांप्रती विद्यार्थी व समाज सदैव ऋणी राहील....

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा....

-शशिकांत कुंभार

(शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2024 मराठी माध्यमातील प्रथम क्रमांक प्राप्त निबंध)


Saturday, 5 April 2025

What Freedoms Do Teachers Want and Why?

 What Freedoms Do Teachers Want and Why?

"A teacher's freedom is the spark that lights the fire of learning." Teachers guide young minds, shaping the future of society through knowledge and character. However, many teachers face restrictions due to administrative constraints and rigid policies. These limitations not only affect teachers' professional satisfaction but also impact the quality of student learning. Imagine an environment where teachers enjoy more freedom—one that allows them to explore innovative teaching methods and form meaningful connections with their students. So, what freedoms do teachers seek, and why are they essential?

One significant freedom that teachers desire is the ability to design their curriculum. While a standardized curriculum ensures uniformity across schools, it often fails to meet the unique needs of individual classrooms. As the saying goes, "One size fits all rarely fits anyone," and this holds true in education. Each group of students has its own learning styles, interests, and cultural backgrounds. When teachers can tailor lessons to address these specific needs, learning becomes more relevant and engaging. For example, a teacher in a rural area might use agricultural examples, while one in an urban setting might focus on city life. Allowing flexibility in curriculum design enables teachers to make learning a more personalized journey that sparks curiosity and joy.

Beyond curriculum design, teachers also want the freedom to choose teaching methods that best suit their students. As the adage goes, "Teaching is the one profession that creates all other professions," which highlights the need for flexibility. Every class consists of students with diverse abilities, personalities, and preferences. While traditional lectures may work for some, others might benefit from project-based learning, hands-on activities, or interactive discussions. This freedom enables teachers to cater to visual, auditory, and kinesthetic learners, helping each child reach their full potential. Moreover, it allows teachers to infuse their passions into the classroom, making it an inspiring environment where learning is not only effective but also memorable.

Another important freedom that teachers seek is the ability to assess students in diverse ways. Standardized exams often measure a narrow range of skills and fail to capture the full spectrum of a student's abilities, such as creativity, critical thinking, and collaboration. As one educator put it, "Assessment should be a celebration of learning, not a test of endurance." When teachers can assess students through projects, presentations, or creative assignments, they gain a more comprehensive understanding of each student's strengths. This approach allows students to demonstrate their knowledge in ways that align with their individual talents, reducing exam-related stress and fostering a more supportive environment. Furthermore, diverse assessment methods enable teachers to provide personalized feedback that promotes growth, giving each student a chance to feel valued.

Administrative tasks present a significant challenge for many teachers. They often find their time consumed by non-academic responsibilities like data entry, paperwork, and other bureaucratic tasks. As one teacher noted, "A teacher's job is to teach, not to tackle mountains of paperwork." These administrative duties take time away from lesson planning, student interaction, and personal development. By reducing administrative responsibilities or providing additional support, schools can free teachers to focus on creating engaging lessons, supporting individual students, and exploring new teaching strategies. This freedom would reignite teachers' enthusiasm and creativity in the classroom, benefiting students in the long run.

Collaboration among teachers is another area where freedom is desired. In an ideal educational environment, teachers would work together, sharing ideas, resources, and techniques across subjects and grade levels. As the saying goes, "Two heads are better than one," and collaborative freedom would allow teachers to create interdisciplinary projects. For instance, a history and science teacher might collaborate on a project exploring the environmental impacts of historical events. Collaboration not only enhances learning for students but also provides teachers with valuable professional growth. Working together introduces fresh ideas and fosters a sense of community within the school.

These freedoms ultimately benefit not only teachers but also students. When teachers are empowered to design their curriculum, select effective teaching methods, choose meaningful assessments, focus solely on teaching, and collaborate with colleagues, they bring their best selves to the classroom. As one teacher put it, "A teacher who feels free is a teacher who inspires." Their enthusiasm creates a more engaging, inclusive, and effective learning environment. When teachers feel respected and valued, they become more passionate about their work, inspiring students to embrace learning. By granting teachers these freedoms, schools foster trust and support, allowing teachers to become innovative leaders who shape the future.

In conclusion, teachers play a crucial role in society, but their potential is often hindered by constraints that limit their creativity and passion. The freedoms teachers desire—flexibility in curriculum, teaching methods, assessments, workload management, and collaboration—are essential for creating a responsive education system that values both teachers and students. These freedoms allow teachers to meet students' diverse needs, connect with individuals, and inspire a lifelong love of learning. As John Dewey once said, "Education is not preparation for life; education is life itself." By trusting and empowering teachers, we improve the classroom experience and create a brighter future for all.

Ultimately, empowering teachers translates into empowered students, who will grow to become the leaders of tomorrow. When teachers feel liberated to teach as they see fit, they will innovate, inspire, and instill a love of learning that lasts a lifetime. In this way, the quest for freedom in education is not just about teachers; it’s about building a better world for everyone.


- तनुजा पेनवाल 

(शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2024 चा इंग्रजी माध्यमातील विजेता)


मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...